विसर्ग

तुले सांगते
ज्या लोकायचे आयुष्य
भिरकावलेले असते
या जगाच्या पसाऱ्यात
ज्येंना पशुपक्षी तर भितेत
त्ये मानूस ह्येत म्हनून,
पर मानूस वागवत नही
मानसापरमाने,
त्येला ईचारावा
जगण्याचा अर्थ
कारण,
फक्त त्येला उलगलेला असतोय,
दुःखामधला इसर्ग अन्
वेदनेच्या काना मात्रा !
-बागेश्री

Post a Comment

0 Comments