पाऊलांना कुठलीच आणि कशाचीच ओढ नसली की,
जगण्याचे संदर्भ बदलतात..!
स्वतःतच रमण्याची ही संधी मानावी की सर्व काही गमावल्याचं द्योतक,
ह्या प्रश्नांत गुरफटून जायला होतं!
ओढीनं ओढलं जाणारं आयुष्य, आपल्यासकट वेळेला घेऊन धावत असतं,
काळाच्या चक्राची पाती भराभर फिरतात....
ओढ सरली, की मग मात्र
घरातून चोरी गेलेल्या सामानानंतरची भकास पोकळी दाटते...
ह्या पोकळीतच उदास श्वास घुटमळू द्यायचे की स्वतःचा, स्वतःपुरता नवा डाव मांडायचा -
हे ठरवायला हवंच!
जगण्याचे संदर्भ बदलतात..!
स्वतःतच रमण्याची ही संधी मानावी की सर्व काही गमावल्याचं द्योतक,
ह्या प्रश्नांत गुरफटून जायला होतं!
ओढीनं ओढलं जाणारं आयुष्य, आपल्यासकट वेळेला घेऊन धावत असतं,
काळाच्या चक्राची पाती भराभर फिरतात....
ओढ सरली, की मग मात्र
घरातून चोरी गेलेल्या सामानानंतरची भकास पोकळी दाटते...
ह्या पोकळीतच उदास श्वास घुटमळू द्यायचे की स्वतःचा, स्वतःपुरता नवा डाव मांडायचा -
हे ठरवायला हवंच!
0 Comments