अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मंटो असो वा मनवर. एक गोष्ट समाजाने कायम ठेवलीय. तुमच्याकडे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच, परंतु लेखक/ कवी म्हणवून घेताना एक जबाबदारीही आहे. तुमच्या लेखणीच्या प्रवाहात आजचा समाज प्रतिबिंबित होत असला तरी "गढूळ" आशय लोकांपर्यत पोहोचवताना लेखणी गढूळली जाणार नाही, ही काळजी घेत व्यक्त होण्याची जबाबदारी.

       लेखकाने कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील असू नये. त्याला जात, धर्म, प्रांत, नसावी. त्याची दोनच आयुधं. एक नजर, दुसरी लेखणी. दिसणारं आहे तसं मांडणं हे त्याला मिळालेलं स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्याला जबाबदारीची झालर आहेच. ती काल- आज- उद्या कधीच उसवून चालणार नाही. हे विसरता नये.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments