असंच असतं माणसाचं

खूप पाऊस होऊन गेल्यानंतर
ढग रिकामे झाल्यानंतर
सुर्यावरचा काळा पडदा हटतो
उबदार किरण धरणीवर येतात
पाखरांचे पंख पाणी झटकून टाकतात
अंग मोकळं करण्यासाठी उंच भरारतात....
रस्ते चकाकू लागतात
पान पान तकाकतं
"पावसाची रिपरिप सरली"
म्हणत त्रासलेले जीव सुटतात
हवाहवासा पाऊस
अतिवृष्टी ठरतो तेव्हा
उघड मिळावी म्हणून
डोळे आकाशाकडे लागतात...

असंच असतं माणसाचं
त्याला दुःखही सोसवत नाही, सुखही!

-Bageshree

Post a Comment

0 Comments